Monday, 19 Jul, 11.29 am
मुंबई: सलग तिसऱ्या दिवशी मुंबईत पावसाचा कहर सुरूच आहे. त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे रुळावरही पाणी भरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेवर 20 मिनिटे उशिराने लोकल धावत असल्याने चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. (Suburban Services on Central Main Line Hit Due to Incessant Rainfall)
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने आज तिसऱ्या दिवशीही मुंबईला झोडपले. रात्रभरापासून कोसळणाऱ्या पावसाने सकाळी चांगलाच जोर धरला. त्यामुळे ठाणे ते नाहूर स्टेनश दरम्यान रेल्वे रुळावर पाणीच पाणी झालं आहे

No comments:
Post a Comment